(गौतम बुद्ध, इ.
स. पू. सु. ६२३ — इ. स. पू.
सु. ५४३). बौद्ध धर्माचे
प्रवर्तक. इ. स. पू.
सातवे-सहावे शतक हे
भारतात अत्यंत वैचारिक खळबळीचे
होते. वैदिककालीन यज्ञसंस्थेला आव्हान
देणारे विचार प्रबळ होत होते. उपनिषद विचार,
पूर्ण काश्यप ह्याचा अक्रियावाद, गोशाल
मस्करिन (मंखलीपुत्र गोशाल)
ह्याचा निरनिराळ्या योनींतून संसरण
केल्यानेच दुःखाचा अंत होतो, असे
प्रतिपादन करणारा संसारशुद्धिवाद, अजित
केशकंबलीचा उच्छेदवाद, पकुध
कात्यायनाचा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख,
दुःख आणि जीव ह्या सात
गोष्टींचा शाश्वतवाद, निर्ग्रथ
जैनांचा चातुर्यामसंवरवाद, वैराटीपुत्र
संजय (संजय बेलठ्ठिपुत्र)
ह्याचा चतुष्कोटिविनिर्मुक्त (आहे, नाही,
आहे व नाही दोन्ही, आहे असेही नाही व
नाही असेही नाही) हा केवळ विक्षेप उत्पन्न
करणारा वाद अशा अनेक वैचारिक
लहरी समाजात प्रसृत झालेल्या होत्या.
यज्ञांतून
होणाऱ्या पशुहत्येच्या सार्थकतेबद्दल
शंका प्रदर्शित केल्या जात होत्या.
जन्मजात श्रेष्ठतेलाही आव्हान दिले जात
होते. अशा वेळी गौतम बुद्धाचा जन्म इ. स. पू.
सु. ६२३ मध्ये झाला. (यूरोपीय विद्वान गौतम
बुद्धाचा काल साठ वर्षे अलीकडे — इ. स. पू.
सु.५६३ — ४८३ — ओढतात).
कोसल देशात शाक्य
कुलात गौतम बुद्धाचा जन्म
वैशाखी पौर्णिमेस झाला.
त्याचा पिता शुद्धोदन
हा एका लहानशा महाजनसत्ताक
राज्याचा राजा होता. त्याच्या आईचे नाव
मायादेवी. ही आपल्या घरून माहेरी जात
असता वाटेत लुंबिनी उद्यानात प्रसूत
झाली अशी आख्यायिका आहे. हे
लुंबिनी ठिकाण नेपाळच्या तराई भागात
आहे. ह्या ठिकाणास सम्राट अशोकाने भेट
देऊन त्या ठिकाणी दगडी स्तंभ उभारून
त्याच्यावर लेख कोरला आहे ‘इध बुद्धे जाते
सक्यमुनि’ (ह्या ठिकाणी शाक्यमुनि बुद्ध
जन्मला) असे म्हणून
त्या ठिकाणच्या लोकांना सरकारी महसूलकराची सूट
दिली आहे (उबलिके कते).
गौतम बुद्धाचा जन्म
झाल्यानंतर लवकरच (आठ
दिवसांत) त्याची आई
मायादेवी ही निवर्तली व
त्याचे पालन-पोषण
त्याची मावशी व
सापत्नमाता ⇨
महाप्रजापती गौतमी (गोतमी) हिने केले.
त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले
होते. गौतम बुद्धाचे चरित्र संपूर्णपणे
सांगणारा असा ग्रंथ पाली किंवा संस्कृत
भाषेत नाही. पाली ग्रंथात
जातकट्ठकथे च्या प्रास्ताविक भागात
(निदान-कथेत) तशा प्रकारच्या प्रयत्नास
सुरुवात झालेली दिसते. तसेच
लोकोत्तरवादी पंथाच्या महावस्तु
ह्या ग्रंथात, सर्वास्तिवादींच्या
ललितविस्तर ह्या ग्रंथात,
अश्वघोषाच्या बुद्धचरितात
किंवा धर्मगुप्त पंथीयांच्या
अमिनिष्कणसूत्रांत असेच अर्धवट प्रयत्न झा
लेले दिसतात. पण ह्या अनेक ग्रंथांतून
चमत्कृतियुक्त काव्यात्मक वर्णने आढळतात.
सध्या उपलब्ध
असलेल्या बुद्धचरित्राविषयीसर्व साधनांत
जुनी, कमी अलौकिक, कमी चमत्कृतियुक्त व
कमी अविश्वसनीय अशी माहिती पाली ग्रंथां
तूनच विखुरलेली आढळते. अर्थात ही त्रोटक,
निरनिराळ्या काळांतील,
निरनिराळ्या प्रसंगांच्या अनुषंगाने
आलेली आहे व अपूर्णच आहे.
सिद्धांर्थाचा जन्म झाल्यावर असित देवल
ऋषीने भविष्य वर्तविले होते,
की हा गृस्थाश्रमातच राहिला, तर
चक्रवर्ती राजा होईल व घरदार सोडून गेला, तर
महान संबुद्ध होईल.
ह्या सिद्धार्थाकरिता त्याच्या पित्याने
मोठी बडदास्त ठेवली होती असे दिसते.
उन्हाळा, पावसाळा,
हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंकरिता त्याने
त्याच्यासाठी तीन प्रासाद बांधले होते.
त्यांत तो मोठ्या ऐषारामाने राहत असे.
गाण्याबजावण्याच्या साहाय्याने
मनोविनोदन करण्याकरिता तरुण
स्त्रियाही त्याच्या सभोवती असत.
त्याचा विवाहही यशोधरा नावाच्या सुंदर
युवतीशी झाला.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
Monday, July 21, 2014
गौतम बुद्ध. भाग:१
Sunday, July 20, 2014
भ्रष्ट ज्वाळा!
झाडावर कावळा अडकला, तरी जिवाची बाजी लावून त्याची सुटका करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचे मुंबईकर नेहमी कौतुक करतो. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असो की आकाशदीप, पूनम चेंबर्स, मुसाफिरखाना अशा हाताळण्यास अत्यंत अवघड इमारत दुर्घटना, त्यात या जवानांनी केलेली कामगिरी नेहमीच लक्षणीय ठरली आहे. परंतु शुक्रवारी अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कच्या आगीत मात्र याच दलाच्या जवानांना इतरांच्या सुटकेसाठी नव्हे, तर स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी झगडावे लागले, ही लाजिरवाणी गोष्ट ठरली. एका उमद्या जवानाचाही त्यात अंत झाला.
या इमारतीत सुरक्षिततेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते, अशी कबुलीच या घटनेनंतर खुद्द मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली आहे. इमारत भस्मसात झाल्यावर जी उल्लंघने कळतात, ती त्याच इमारतीला अग्निशमन दलाची एनओसी देताना पालिका यंत्रणेला 'वळत' नाहीत का? साधारण दहा वर्षांपूर्वी मुंबईची स्कायलाइन गगनचुंबी इमारतींनी व्यापू लागली, तेव्हा या उंच इमारतींनी त्यांच्या अग्निसुरक्षेची व्यवस्था स्वतःच करायची असते, असे अग्निशमन प्रमुख त्यावेळी सांगत. मग याच लोटस पार्कचेच उदाहरणच घ्यायचे, तर पहिली बचावाची यंत्रणा म्हणजे पाण्याचे स्प्रिंकलर्स का काम करीत नव्हते, याची जबाबदारी कुणाची?
मनोरंजननगरीतील नामवंतांपासून ते ज्यांच्यावर कर्जबुडवेगिरीचे आरोप आहेत, अशा कुप्रसिध्दांपर्यंत सर्वांची कार्यालये या इमारतीत होती. आगीची कारणे शोधताना हा दुवा महत्त्वाचा राहीलच, त्याचप्रमाणे अशा बड्या धेंडांच्या इमारतीला अग्निशमनाची एनओसी किती सुलभपणे मिळते, तेही पालिकेने सांगून टाकावे. मुंबईच्या उष्ण तापमानात मुळात असे काचेचे फसवे 'फसाद' हवेत कशाला? वांद्रे-कुर्ला संकुलात दोन वर्षांपूर्वीच अशा काचेरी इमारतीत आग लागली होती, तेव्हा या देखाव्यातील पोकळपणा उघड झाला होता. आज मात्र वांद्रे- कुर्ला संकुलातील अर्ध्याअधिक चकाचक इमारती काचांचे फसादच मिरवत आहेत. प्रश्न उरतो तो अग्निशमन दलांचे प्रशिक्षण आणि साधनसामग्रीचा. मुंबई आणि ठाणे या दोन मोठ्या शहरांतील अलीकडच्या काही घटनांमध्ये अग्निशमनाचे प्रशिक्षण व सामग्री या दोन्हींविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाण्यातील तारांगण संकुलात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानांचा लिफ्टमध्ये श्वास कोंडून मृत्यू झाला होता.
आग किंवा दुर्घटनेत अग्निशमन दलाने कधीच लिफ्टचा वापर करायचा नाही, हा पहिला धडा असतो. दिवंगत नितीन इवलेकर यांनी अग्निरोधक सूट घातला होता, तरीही त्यांना प्राण गमवावा लागला, असे निष्पन्न झाले आहे. अग्निशमन दलासाठी हेलिकॉप्टर किंवा आधुनिकीकरण करण्याच्या योजना केवळ वल्गनाच ठरल्या आहेत. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे ज्या इमारतीत कोणी राहत नव्हते, तेथील आगीसाठी मुंबईतील सर्वच्या सर्व अग्निशमन केंद्रांना पाचारण करणारा ब्रिगेड कॉल देण्याची गरज होती का? दिवस पावसाळ्याचे आहेत व अशा वेळी इतरत्र कोणती दुर्घटना घडली असती, तर ती परिस्थिती आपण कशी हाताळली असती? कित्येक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीच्या हातात असलेल्या मुंबई व ठाणे या दोन्ही महापालिकांमध्ये झालेल्या या भ्रष्ट नियोजनाची जबाबदारी या पक्षांनाही टाळता येणार नाही. इमारतींच्या परवानग्यांमधील लोणी हे सर्वपक्षीय आणि अधिकारीवर्गाच्या खिशात झिरपते, हे तर खरेच. त्यामुळेच राज्य सरकार हस्तक्षेप करून परस्पर परवानग्या देते हे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी म्हणायचे आणि राज्य सरकारने पालिकेकडे चेंडू ढकलायचा, एवढेच सुरू राहते. कचकड्या इमल्यांमध्ये निरपराध मात्र हकनाक बळी ठरतात.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
Subscribe to:
Posts (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
सबसे कम मात्र 19 वर्ष कि आयु में ‘परमवीर चक्र’ प्राप्त करने वाले इस वीर योद्धा योगेन्द्र सिंह यादव का जन्म उत्तर प्रदेश के बुलंदशहर जनपद के ...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...