आपण सर्व बाबासाहेबाना बोधिसत्व
असे संबोधतो. परवाच्या रविवारी
विहारात चक्क एका स्त्रीने हा प्रश्न
विचारला की बोधिसत्व म्हणजे
काय? ते कसे प्राप्त होते? . मग
तिथल्या धम्मचा-यानी बोधीसत्वा
बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
हाच प्रश्न इतराना पडत असल्यास
त्याचे उत्तर म्हणून बोधिसत्वाचा अर्थ
व प्राप्त होण्याचे टप्पे ईथे देत आहे.
बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या
व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे
अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे
पालन करताना बोधिसत्वाकडे
स्थित्यांतर सुरु होते.
१० पारमिता
१) शील:- शील म्हणजे नितिमत्ता,
पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे,
अपराध करण्याची लाज वाटणे.
२) दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार
अर्थात तन, मन धनानी दुस-याची
भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे अलिप्तता,
अनासक्ति, आवड-नावड नसणे,
फलप्राप्तिने विचलीत न होणे,
निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा
त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणे, हाती
घेतलेले काम माघार न घेता पूर्ण
सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात,
द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने
द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे,
कोणाचीही चुगली न करणे,
कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ
निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा
विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे
करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते
सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे
म्हणजे मैत्री होय.
वरील दहा पारिमितांचा सराव करता
करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते.
ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा
टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था.
एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की
मग जी अवस्था प्राप्त होते तीला
बुद्धत्व म्हणतात. तर दहा
पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व
प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते
पाहू या.
पायरी: १) मुदिता:- आनंदर प्राप्त
करुन घेतो, सर्व पाणिमात्रांच्या
कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व
विचार काढून टाकणे आणि दयाशील
बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व
अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज
होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते,
तो कशाचाही त्याग करण्यास तयार
होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे
तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग
मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान
व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या
बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष
व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध
असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा
बाळगणे.
पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप
होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त
होऊन परोपकार, सहनशीलता व
व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती,
शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण
अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले
आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी
जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती
अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत
उपासकास धर्म, शास्त्र, दिशा जगाचे
संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत
बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि
प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन
करता करता साधक बोधिसत्वाच्या
एक एक पाय-या चढायला सुरुवात
करतो. एक एक टप्पा पार करायला
कित्येक वर्षे जावी लागतात. दहा
पारिमिताचा पाया जेवढा भक्कत
तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या
ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर दहा
पारिमितांचे पालन करत करत
बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष
जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात
झाल्यावाचून राहिले नसते.
Wednesday, April 29, 2015
बोधिसत्व कसे प्राप्त होत
22 प्रतिज्ञा
बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच.
पण धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही
होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त
करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या.
बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत
१) मी ब्रह्मा , विष्णु , महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी
मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११) मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३ ) मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४) मी चोरी करणार नाही.
१५) मी व्याभिचार करणार नाही.
१६) मी खोटे बोलणार नाही.
१७) मी दारू पिणार नाही.
१८) ज्ञान (प्रज्ञा) , शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या व
मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२) इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी
प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
रामोशी समाजाची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी हे स्वताला रामवंशी समजत असत. म्हणून काही तज्ञ व्यक्ति रामोशी या शब्दाची फोड र...
-
सबसे कम मात्र 19 वर्ष कि आयु में ‘परमवीर चक्र’ प्राप्त करने वाले इस वीर योद्धा योगेन्द्र सिंह यादव का जन्म उत्तर प्रदेश के बुलंदशहर जनपद के ...