Showing posts with label Think about it. Show all posts
Showing posts with label Think about it. Show all posts

Friday, February 28, 2020

हिन्दू या मुस्लिम के अहसासात को मत छेड़िये


हिन्दू या मुस्लिम के अहसासात को मत छेड़िये 
अपनी कुरसी के लिए जज्बात को मत छेड़िये 

हममें कोई हूण, कोई शक, कोई मंगोल है दफ़्न है जो बात,
अब उस बात को मत छेड़िये 

ग़र ग़लतियाँ बाबर की थीं; जुम्मन का घर फिर क्यों जले 
ऐसे नाजुक वक्त में हालात को मत छेड़िये 

हैं कहाँ हिटलर, हलाकू, जार या चंगेज़ ख़ाँ मिट गये सब, 
क़ौम की औक़ात को मत छेड़िये 

छेड़िये इक जंग, 
मिल-जुल कर गरीबी के ख़िलाफ़ दोस्त, 
मेरे मजहबी नग्मात को मत छेड़िये
- अदम गोंडवी

Saturday, July 20, 2019

गरुड की पोल्ट्रीची कोंबडी....

माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले.....!
मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले.
  पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला....!
एक दोन व्यवसायात अपयश आलेले,नोकरीतही तग धरत नाही
महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही.
 
का झाले असावे असे.....?
मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला...!
   जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.....!
   बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात,शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात.....!
   पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते,
  त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोआराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात.
   ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात,ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात,
   पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात;
   असे का,याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे....!
  
तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे....!
   
गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू,स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे,
    तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.
  
आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात....!
पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३०/३५ हजारात गेला.मुलांना कॉन्व्हेंट शाळा,सकाळी बिस्किट,मॅगी,केक,स्कूल बस,घरी परत आल्यावर हातात जेवण,
पुस्तके व गाईड्स,क्लासेस,पॅरेंट मीटिंग,लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती,पालकही अभ्यास घेतात,मुलांना वार्षिक सहल,गृहपाठ,प्रोजेक्ट,
अजून बरंच काही.

मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात,
   
जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो,त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो.कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते.विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो.
     तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते....!
  
आपला मुलगा म्हणजे खूप हुशार,हिरो,मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा,प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात.
   *)परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो....!

मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो,तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते.
१० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही.
उद्योग व व्यवसाय करावा,तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.
   
पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो.
   

काय चुकले असेल या पालकांचे....?

    एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर मग मुलं अपयशी का....?
    पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल घेवुन दिला,
त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला,

पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का...?.
 
कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली,
पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने,वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का...?
   
जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते,
रोज समोर खाद्य टाकले जाते,पण त्या कोंबडीला हे माहित नसते,की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते,
ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे...! लागते,चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते.
ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही...!
    याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत....!
   लहानपणी शाळेची पुस्तके जुनी,फाटलेली,मित्रांची किंवा भावाची वापरली.शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती,शाळेत जायला साधी सायकलही नव्हती.
   पाटी,दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे.जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची.
    आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची.
   केक,मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा..!
   गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे,नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची......!
    कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक.एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा,झाडाचा डिंक काढायचा,बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा.....!
    आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात....!,
ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?

    कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे....!

शिकण्याची इच्छा असते,
इंजिनिअर व्हावे,
पुण्याला जावे,
मुंबईला जावे,
परदेशात जावे,

पण वडिलांनी साफ सांगितले,
आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही.

*आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका.१२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस,थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा...!*
    *अशी मुलं पुढे होतात गरुड...!*

कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत.

ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते.
ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात,
तो डोकं चालवायची तसदीच का घेईल?
शाळेत असताना ज्यांना घरची शेती,घरकाम,दुकानातील काम करावे लागते,त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते.गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते.

व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते.१२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात.

अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात,त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते.

ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात.गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही,ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात...!
  
जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात....!
  
पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो.
  जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते....!

तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात....!
  पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की...!
 
पोल्ट्रीची कोंबडी..?
    महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा....!,
  मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत...
    यासाठी हा लेख पाठवलाय आम्ही....!
तुम्ही खारीचा वाटा उचला...!
ही विनंती!
  आपल्याला एवढंच  करायचं आहे....!

हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा....!

Thursday, July 18, 2019

माणुसकीची किंमत

अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.
‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का?’ त्या म्हातार्याा आजिबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.
‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रुम शिल्लक नाही.’ त्या निग्रो तरुणाने सांगीतले पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणुकाही त्याचा अपराध असावा.
‘बघाना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल.’ म्हातारबुवा म्हणाले. थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खीशात घालावेत असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.
‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघुन गेला.
थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजुड बॅग काढत असतातना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला.
‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.
‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा!’ तो निग्रो तरुण म्हणाला.
‘तु कोठे झोपणार?’ त्या आजिबाईंनी विचारले.
‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट!’ तो निग्रो तरुण म्हणाला.
आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालु करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.
दुसर्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते.
‘किती पैसे झाले?’ त्या आजोबांनी वरचारले
‘पैशांचे आपण नंतर बघु. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो.’ असे सांगुन तो निग्रो तरुण पॅन्ट्रिमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.
‘किती पैसे द्यायचे?’ त्या म्हातारबुवांनी ब्रेक फास्ट झाल्यावर विचारले.
‘त्याचे असे आहे. मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत.’ तो निग्रो तरुण म्हणाला.
‘असे कसे? बर मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.
‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहीले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाष्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडुन पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.
तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातुन काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्यात टाकु लागला. म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिषातुन हॉटेलच्या गल्यात टाकत होता.
ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकित आणुन ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो.’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही वाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरुन आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.
‘हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत. आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का?’ आजोबांनी विचारले.
थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल.’ म्हातारबुवांनी बघीतले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या.
त्या आजिबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे.’
‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या!’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातुन हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.
पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघीतला. ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकीत होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची ईच्छा असायची.
ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्युचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्युला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.
तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्हुला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इन्टरव्ह्युचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत. त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिममध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच.
चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.
‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नि लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत.’ ते आजोबा म्हणाले.
‘त्या दिवशी रात्री तु आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस त्यामुळे आम्ही भारावुन गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही.’ आजीबाई म्हणाल्या
‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तु आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का?’ ओ किफे साहेब म्हणाले.
‘जनरल मॅनेजर?’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण--- ‘
‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे.’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले, ‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारचे शिक्षण घेता आले नाही हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजते. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो त्यात तु उत्तम मार्काने पास झाला. जेव्हा तु आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तु नुसताच प्रामाणीक माणुस नाहीस तर ऊत्तम कॅरॅक्टर असलेला माणुस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणुन तुझे स्वागत असो!’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.
कधी कधी माणुसकीची आणि कॅरॅक्टरची अशी पण किंमत मिळते.
(एका सत्य घटनेवर आधारीत)
ही कथा आहे मला भावलेली...
मी ही कथा एका ग्रुप मध्ये वाचली होती.

पोस्ट आवडल्यास शेअर करा चांगले विचार दुसऱ्या पर्यंत पहोचवा...

Tuesday, July 16, 2019

बिक रहा है पानी

बिक रहा है पानी ,
पवन बिक न जाए ।
बिक गई धरती ,
गगन बिक न जाए ।

चांद पर भी 
बिकने लगी है जमीं , 
डर है कि सूरज की 
तपन बिक न जाए।

हर जगह बिकने लगी है
 स्वार्थ नीति ,
डर है कि कहीं 
धर्म बिक न जाए ।

देकर दहेज खरीदा गया है 
अब दूल्हे को ,
कहीं उसी के हाथों 
दुल्हन बिक न जाए।

हर काम की रिश्वत
 ले रहे अब ये नेता ,
कहीं इन्ही के हातों
 वतन बिक न जाए।

सरेआम बिकने लगे
 अब बो सांसद ,
डर है कि कहीं 
संसद भवन बिक न जाए।

आदमी मरा तो भी 
आंखें खुली हुईं है ,
डरता है मुर्दा 
कहीं कफन बिक न जाए।





प्रस्तुति –
कु० – पारूल वार्ष्णेय
न्यू ऑक्सफोर्ड कन्या हाई स्कूल नाधा (बदायूं)
कक्षा – आठ

Saturday, June 8, 2019

तुमचं Gmail अकाऊंट किती ठिकाणी आहे लॉग इन, असं करा चेक_

◆ Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असेलल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात.

◆ पण अनेकदा जीमेलच्या व्हेरिफिकेशन कोडसाठी ईमेल पाठवला जातो अशा वेळी अन्य कोणी आपलं जीमेल अकाऊंट हॅक केलं तर अशी भीती वाटते.

◆ तुमचं जीमेल अकाऊंट कुठे कुठे लॉग इन आहे हे पाहता येतं कसं ते जाणून घेऊया.

◆ सर्वप्रथम आपलं जीमेल अकाऊंट ओपन करा. त्यानंतर त्यातील सेटींगमध्ये जा.

◆ सेटींग ओपन केल्यावर तुम्हाला समोर एक जीमेल आयडी ओपन झालेला दिसेल त्यावर टॅप करा.

◆ ‘Manage your google account’ सिलेक्ट करा.

◆ हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर पेजवर काही इतर पर्याय दिसतील. ज्यामध्ये ‘Security’ या पर्यायावर क्लिक करा.

◆ त्यानंतर खालच्या दिशेने स्क्रोल करा. ‘Your Devices’ चा एक पर्याय मिळेल.

◆ ‘Your Devices’ वर क्लिक केल्यास तुमचं जीमेल लॉग इन असलेल्या सर्व डिव्हाईसच्या नावाची एक लिस्ट समोर येईल.

Saturday, June 1, 2019

Try this Japanese water therapy to lose weight!

While we are well aware of the fact that water is extremely essential for our well being and keeping the body functioning properly, we don’t quite recognise it as a therapy to lose weight.
It is also advised by the doctors to drink at least 8-10 glasses of water every day to flush out the toxins from the body and kick-start your day.
But what if we told you that the humble H20 can also be effective in losing weight? No, we are not kidding. While a lot of medical experts advice us to drink warm water with a dash of lemon and 
honey
 the first thing in the morning, the Japanese actually treat water as a complete weight loss therapy on its own.
What is the Japanese water therapy for weight loss?
This therapy actually talks about how a happy stomach is essential for overall health and to shed those stubborn kilos as well. The mere objective of this practice is to regulate your body with the help of water. It focuses more on the betterment of gut health as a lot of medical conditions are caused due to poor digestive health.
So, how exactly does this therapy help you in losing weight? We tell you in 5 easy steps:
1. Drinking water the first thing in the morning not only helps to kick-start the day but it also helps in flushing out the toxins from the body. Opt for lukewarm water or room temperature water on an empty stomach. It is advisable to drink around 4-5 glasses of water as soon as you wake up.
2. After you begin your day by brushing your teeth, make sure you do not eat or drink anything except water (if you feel like) for a minimum of half an hour to forty-five minutes.
3. Strictly avoid drinking water for at least 2 hours after you have eaten your meals.
4. It is important to keep in mind that those who are battling severe ailments and even the elderly should gradually increase their water intake. They can start with one glass of water in the morning.
5. Make it a point to never drink (or eat) while you are standing.
The bottom line
If you follow this water therapy properly, you will notice a change in the way your body works. This is because when your digestive system works properly, it boosts your 
metabolism
 as well. As a result, you tend to lose weight in a healthy manner, minus all the side-effects of the fad diets.
Disclaimer: This article is not a substitute for qualified medical advice. Please consult your trusted medical professional for further information.

Sunday, May 5, 2019

ती....तो....आणि तिची मासिक पाळी...!

प्रतीकात्मक चित्र


सगळ्या विश्वाची निर्मिती कुणी केली..?
तर उत्तर येतं..."देवाने...!"
मग पुरुष कुणी निर्माण केले..?
देवाने...
स्त्रीया कुणी निर्माण केल्या...?
देवाने...!
मग स्त्री ची मासिक पाळी कुणी निर्माण केली...?
देवानेच ना...?
जर देवाला मासिक पाळी आवडत नाही तर मग त्याने ती स्त्रीला दिलीच कशाला..?
मासिक पाळी म्हणजे काय...? गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अंतत्वचा...!
गर्भधारणा झाली नाही तर दर महिन्याला 5 दिवस ही क्रिया घडते की जिला आपण मासिक पाळी म्हणतो...!
आता मासिक पाळीत जे रक्त बाहेर पडतं ते अशुद्ध असतं असा एक गैरसमज आहे किंवा या काळात स्त्रीया निगेटिव एनर्जी बाहेर टाकत असतात...असा एक फालतू गैरसमज आहे...
खर तर दर महिन्याला गर्भाशय तयार होतं आणि गर्भधारणा न झाल्याने ते बाहेर टाकलं जातं...मग ते अशुद्ध कसे असेल...?
उलट ज्या ठिकाणी बाळाचं 9 महीने 9 दिवस संगोपन होणारे त्या जागी शरीरातील चांगलच रक्त असेल ना...? की अशुद्ध असेल..?
झाडाला फूल येतं मग त्या फुलाच फळ होतं...
आपण झाडाची फुले देवाला घालतो...कारण देवाला फुले आवडतात...
बाईला मासिक पाळी येते...आणि म्हणून गर्भधारणा होते...
म्हणजे मासिक पाळी जर 'फूल' असेल तर गर्भधारणा हे 'फळ' झालं..!
देवाला झाडाच फूल चालतं मग मासिक पाळी का चालत नाही..?
मासिक पाळी आलेल्या बाईचा साधा स्पर्श चालत नाही..?
कधी कधी ती घरात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलते...
की जे सरळ-सरळ निसर्गाच्या विरोधात जाणं आहे...
आणि याचा त्रास तिलाच होतो...
मुळात प्रोब्लेम जो आहे ना तो पुरुषी मानसिकतेत आहे...
तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे या पुरुषी अहंकाराचा आहे आणि त्या पेक्षा सर्वात जास्त स्वतः स्त्रीच्या मानसिक गुलामगिरित आहे...
या गोष्टींकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलेलच नाहिये...!
मासिक पाळी ही बाईची कमजोरी नसून निसर्गाने बाईला दिलेली ही जास्तीची शक्ती आहे की जी तिला आई बनण्याचे सुख बहाल करते...
आणि कोण आहेत हीे फालतू जनावरं की जी सांगतात ' बाईला मासिक पाळीत मंदिरात प्रवेश नाही म्हणून..?'
बाईच गर्भाशय म्हणजे वाटलं काय तुम्हाला..? कोण ही जनावरं की जी सांगतात 10-10 मुलं जन्माला घाला..!
अरे एका बाळंतपणात बाईची काय हालत होते ना ते आधी 'तुमच्या आईला' जाऊन विचारा...
पोटाच्या बेंबीपासून ते छातीपर्यन्त 9 महीने 9 दिवस बाईने आणखी एक जीव वाढवायचा...त्याला जन्म द्यायचा..त्याचे संगोपन करायचं...
आणि एवढं सगळं करुन मुलाच्या नावात आईचा साधा उल्लेखही नाही..!
मुळात गडबड आहे ना ती इथल्या सडक्या मेंदूत आहे..!
प्रश्न आहे तो
बाईला केवळ भोगवस्तु म्हणून पाहणाऱ्या इथल्या घाणेरड्या पुरुषी मानसिकतेचा...!
आणि जास्त गडबड आहे ती "तिच्यातच" आहे, कारण तीच स्वतःला समजून घेत नाही...ती कुटुंबाच्या भल्यातच इतकी गुंगते की तिला या गोष्टींवर साधा विचार करायलाही फुरसत नाही...
हे सगळं चालू आहे ते "ती" गप्प आहे...ती विद्रोह करत नाही...ती मुकाट्यांन सहन करते...म्हणून !!!
गरज आहे तिला विद्रोह करण्याची....
इथल्या दांभिक वास्तवाविरुद्ध...
इथल्या सडक्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध...
इथल्या धर्माच्या अवडंबाविरुद्ध...
आणि गरज आहे त्याने..
तिला समजून घेण्याची...
तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची...
तिच्या भावभावनांना समजून घेण्याची...
आणि या विद्रोहात तितक्याच हळुवारपने 'तिला' मदत करण्याची...!
मित्रांनो...
विचार तर कराल...?





- संग्रहित लेख 
आंतरजालावरून साभार

Monday, April 29, 2019

भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन  नियम

1. प्रकृतिचा  पहिला नियम:

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व  घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून  व बुद्धीत सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत..

2. प्रकृतिचा दूसरा नियम:

ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.

सुखी सुख वाटतो,
दुःखी दुःख वाटतो,
ज्ञानी ज्ञान वाटतो,
भ्रमित करणारा भ्रम वाटतो.
घाबरणारा भय वाटतो,

3. प्रकृतिचा तिसरा नियम:

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण

भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात,
पैसा पचला नाही तर देखावा वाढतो,
बातचित पचली नाही तर  चुगली वाढते,
प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो,
टिका  पचली नाही तर दुश्मनी वाढते, गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो,
दुःख पचले नाही तर  निराशा वाढते,
आणि सुख पचले नाही तर  ऊन्मत्तपणा वाढतो...

Friday, April 19, 2019

मतदान नक्की कराच ...

मतदान नक्की कराच ...
कारण
1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
मतदान नक्की कराच ...
कारण
इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता.
मतदान नक्की करा ...
कारण
1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि  हिटलर युगाची सुरुवात झाली.
मतदान अवश्य करा ...
कारण
1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
मतदान अवश्य करा ...
कारण
1917 ला सरदार पटेल अहमदाबाद
महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते.
मतदान अवश्य अवश्य करा ...
कारण
1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत.
आता ,
मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा.100% मतदान करा

Friday, April 12, 2019

बकेट लिस्ट

               तुमची बकेट लिस्ट अर्थात मृत्युपूर्व डोहाळे यादी काय आहे? परवा 'द बकेट लिस्ट' चित्रपट पाहिला. भन्नाट पिक्चर आहे. कुठलीही मारधाड़ नाही, सेक्स नाही, स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अँँनिमेशन नाही, कसलाही मसाला नाही, कुठलाही फॉर्म्युला नाही. मग असला सपक पिक्चर बघायचा तरी कशाला? असा प्रश्न तुम्ही मला विचारलात तर मला आश्चर्य वाटणार नाही.

                हा चित्रपट बघायचा त्यातील अप्रतीम संदेशासाठी आणि जमलंच तर त्या संदेशाची जशी जमेल तशी वैयक्तिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी...

            तर बकेट लिस्ट म्हणजे नक्की काय हो? इंग्लिश भाषेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात एक बोली वाक्प्रचार आहे - To kick the bucket - त्याचा मराठी समानार्थी उपयोग सांगायचा तर 'त्याने अखेरचे डोळे मिटले' किंवा 'त्याने शेवटचा श्वास घेतला' असा सांगता येईल. मग बकेट लिस्ट म्हणजे काय, तर मरणापूर्वी करायच्या काही महत्वाच्या कामांची यादी.

              अशी यादी माणूस सहसा करत नाही. काही मोजक्या लोकांना मृत्यूची चाहूल लागते म्हणतात, ते लोक अशी यादी करत असावेत. अन्य काही थोडके लोक मृत्युपत्र करतात. पण बकेट लिस्ट म्हणजे मृत्युपत्र नव्हे. मृत्युपत्रात मरण पावलेल्या माणसाच्या इच्छेनुसार त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी याची जंत्री असते. 

          बकेट लिस्ट मध्ये अद्याप जिवंत असलेल्या पण मृत्यूची चाहूल लागलेल्या माणसाच्या अपूर्ण इच्छांची यादी असते. मग यात काहीही असू शकतं. अगदी ५ किलो आईसक्रीम एकट्याने खावं किंवा अमिताभ बच्चन सोबत चहा घ्यावा किंवा आयफेल टॉवर चढून जावा किंवा आयुष्यभर तोंड न पाहिलेल्या भावाशी पुन्हा जुळवून घेऊन मनसोक्त गप्पा माराव्यात यापैकी किंवा आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात. (आपल्याकडे काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातून, असाच काहीसा, या क्षणात जगून घ्या असा संदेश दिला आहे, त्याची आठवण या निमित्ताने झाली.) 

         द बकेट लिस्ट या चित्रपटात असेच दोन अवलिये दाखवले आहेत. दोन तोडीस तोड पट्टीच्या अभिनेत्यांनी या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. जॅक निकोलसन आणि मोर्गन फ्रीमन! आयुष्यभर इमाने इतबारे कार मेकॅनीकचे काम केलेला कार्टर चेंबर्स (फ्रीमन) आणि अब्जाधीश असलेला रुग्णालय साखळीचा मालक एडवर्ड कोल (निकोलसन) या दोघांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याने पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते आणि ते दोघेही एकाच दोन खाटांच्या खोलीत एकमेकांना उपचारा दरम्यान भेटतात. दोघांनाही एकमेकांविषयी काहीही ममत्व वाटत नसते आणि आता आपण लवकरच मरणार आहोत ही जाणीव छळत असते.

           चित्रपटाच्या सुरुवातीलाच दोघांनाही त्यांचे डॉक्टर स्पष्ट पणे सांगतात की ते आता ६ महिने किंवा फार तर फार १ वर्षाचे सोबती आहेत. इथेच या चित्रपटाने माझ्या मनाची घट्ट पकड घेतली. घरात कर्करोगाचा रुग्ण जवळून पाहिल्याने म्हणा किंवा मित्र परिवार, परिचित लोकांमध्ये तरुणांचे कर्करोगाने होणारे मृत्यू ऐकून म्हणा, जीवनाची क्षणभंगुरता माझ्या मनात अगदी ठसली आहे. या चित्रपटात ती जाणीव अधोरेखित झाली. 

          रुग्णशय्येवर पडल्या पडल्या कार्टर एक बकेट लिस्ट लिहित असतो. डॉक्टरांनी सहा महिन्याची मुदत जाहीर केल्यानंतर आणि पहिल्या तीन इच्छा लिहिल्यानंतर कार्टरचा त्या बकेट लिस्ट मधला रस जातो आणि त्या कागदाचा बोळा करून तो फेकून देतो. 
(त्याची १३ इच्छांची यादी खाली दिली आहे.) 
१. Witness something truly majestic 
२. Help a complete stranger
 ३. Laugh until I cry
 ४. Drive a Shelby Mustang
५. Kiss the most beautiful girl in the world 
६. Get a tattoo 
७. Sky diving 
८. Visit Stonehenge 
९. Drive a motorcycle on the Great Wall of China 
१०. Go on a Safari 
११. Visit the Taj Mahal 
१२. Sit on the Great Egyptian Pyramids 
१३. Find the Joy in your life
            तो बोळा नेमका कोलच्या हाती येतो. तो ती यादी वाचतो आणि त्याला ती कल्पना भयंकर आवडते. कोल कार्टर ला त्या यादीविषयी विचारतो, त्यांची एक उत्तेजित भावनापूर्ण चर्चा होते आणि दोघांचे ठरते, की आपण ही बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा.

           कार्टरची बायको या सगळ्याला खूप विरोध करते. पण कार्टर तीला म्हणतो, "मी माझं सगळं आयुष्य कारच्या उघडलेल्या बॉनेट खाली दुरुस्ती करत काढलं. कुटुंबाप्रती सर्व जबाबदाऱ्या प्रेमाने निभावल्या. आता मला माझ्यासाठी म्हणून काही क्षण जगायचे आहेत. मला अडवू नकोस."

           मी विचार करत होतो, आपण स्वतःसाठी खरंच किती जगतो? कायम जबाबदाऱ्या, रोजच्या जगण्यातली आव्हानं, मुलांचं मोठं होणं, पालकांचं दुसरं बालपण/ आजारपण, गृहकर्ज चुकवणे या आणि अशा असंख्य व्यवधानात आपलं आयुष्य कसं सरलं हे लक्षातही येत नाही. आपल्या मनातल्या काही इच्छा तरी, मरणाच्या दारात असताना पूर्ण करण्याची तयारी करण्यासाठी मन खंबीर असावं लागतं महाराजा! 

        मला तर म्हणायचं आहे की मरणाच्या दारातच कशाला असं मन खंबीर करावं? एरवी देखील करावं कधी तरी ५ वर्षातून एकदा. आणि दरच वेळी काही महागडी टूर केली पाहिजे असं नाही. काही नाही तर निदान कासच्या पठारावर उमलणारा रानफुलांचा महोत्सव तरी बघावा एकदा डोळे भरून. कुठलेही बुकिंग न करता काशी यात्रा करून यावी. शेतात जाऊन कुणाच्या तरी मस्त मातीत हात घालावेत, भाकऱ्या भाजाव्यात चुलीवर, किंवा थोडा वेळ घालवावा एखाद्या hospice home मध्ये मरणासन्न लोकांचे अखेरचे बोल ऐकण्यात. करतो का आपण असं काही? का नाही करत? हे माझे मला 'बकेट लिस्ट' मुळे पडलेले प्रश्न.

         मग निघतात दोघं सफरीला. स्काय डायविंग करतात, ताज महाल, चीनची भिंत, नेपाळ मधून हिमालय, इजिप्तचे पिरॅमीड, टांझानियाचे सिंह अभयारण्य असं आणि बरंच काही. इजिप्त मध्ये त्यांची चर्चा होते 'ममी'विषयी. कार्टर कोल ला विचारतो, की तुला या ममी संस्कृती विषयी काही माहिती आहे का? 

       कार्टर ने या वेळी विचारलेले दोन प्रश्न माझ्या मनात घट्ट रुतून बसले आहेत. अगदी मधमाशीची नांगी त्वचेत रुतून बसते ना, तसे. खाली दिलेत. 
Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven):

1. Have you found joy in your life? ( एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का? )

2. Has your life brought joy to others? 
( दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का? )

       खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी. त्यासाठी मला माझी बकेट लिस्ट अर्थात मृत्यूपूर्व डोहाळे यादी करायला हवी. आणि नुसती करून उपयोग नाही, ती अंमलात सुद्धा आणायला हवी. 

          चित्रपटात पुढे बरंच काही घडतं. या स्फुटलेखनाचा उद्देश त्या चित्रपटाचे परीक्षण किंवा रिव्ह्यू करणे असा नाही. दोघे मिळून ती लिस्ट पूर्ण करतात. कार्टर चा कर्करोग मेंदूत पसरतो आणि त्याचे निधन होते. पण मृत्युपूर्वी तो कोल च्या मनातली त्याच्या मुलीविषयी असलेली अढी दूर व्हावी या विषयीची बीजे रोवतो. नंतर कोल चे देखील निधन होते. पण मरणापूर्वी त्याचे आणि त्याच्या लेकीचे मनोमीलन होते. तो त्याच्या नातीचा पापा घेतो आणि बकेट लिस्ट मधली Kiss the most beautiful girl in the world ही गोष्ट पूर्ण करतो. 
   
     
       कसंही करा आणि हा चित्रपट बघाच. तुमची बकेट लिस्ट बनवाच. आणि ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. 
    
          एका तरी माणसाला बकेट लिस्ट करायला उद्युक्त करेन, ही गोष्ट मी माझ्या बकेट लिस्ट मध्ये लिहिली आहे.

लेखक माहीत नाही..

Wednesday, March 27, 2019

we grew up!

Somewhere between
“ 8 toffees for 1 rupee” 
and 
“1 toffee for 8 rupees”,
we grew up!


Somewhere between
“Ground mein aaja”
and
“Online aaja”,
we grew up!


Somewhere between
“stealing chocolate of our sister” 
and 
“Buying chocolate for her children”,
we grew up!


Somewhere between
“Just five more mins Mummy ”
and
“Pressing the snooze button”,
we grew up!


Somewhere between
“Crying out loud just to get what we want” 
and 
“Holding our tears when we are broken inside”,
we grew up!


Somewhere between 
“I want to grow up” 
and
“I want to be a child again”,
we grew up!


Somewhere between
“Lets meet and plan” 
and
“Lets plan and meet”,
we grew up!


Somewhere between
"Being afraid of our parents"
and 
"Praying for our parents"
we finally grew up!


And as we grew up, 
we realize;
How silently, 
our lives have changed...?

Wednesday, August 9, 2017

Successful people

Successful people can't relax on chair.

   They relax by WORK.

They sleep with a DREAM.

   Awake with COMMITMENT &
Work towards GOALS.

   That's the SPIRIT of life.

Saturday, May 27, 2017

leave the hand of such friends immediately

Your colleague friends Your gang Your group is always interested in you. Friends will say you do as well. Our attitude, likes, fashion, our speaking, routine, and career decisions are always decided by consulting with friends.


This friend is closer to you than your own house.


But how do you know whether these friends are your stalwarts or your predecessors?


Some of his tests have been reported by a London based online portal.

1) Do it or not possible

This simple test has been used by this study in reference to many friends. What do you mean if a friend is going to make a friend or work? So what is the reaction given without first thought?

 (हे पण वाचा कबुलच्या मुली मुलांच्या वेशात)

Do it I mean, what's the matter, do you, we are not?


Say so


Of


Something else, what comes out of your head, your age is what you talk about, who understands yourself, has been improbable.


What do you mean?


This friend you?




The test is simple, very simple.


But think of it in the context of your friends.


So what if your friend gives you the first reaction, suppose they are nutritious to your progress.


If you are giving one another, then suppose they are dangerous, they kill your enthusiasm.


You bind them


Simply leave the hand of such friends immediately.


==============================================


From Editor's desk


If you have any article, story, or poem in Hindi, english or Marathi, which you want to share. Please email us with that information (if you do not have a photo) with your photo. Our email address is: Swapnwel@rediffmail.com

We'll PUBLISH this blog with your name and photo

. Thanks!


माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...