आपण सर्व बाबासाहेबाना बोधिसत्व
असे संबोधतो. परवाच्या रविवारी
विहारात चक्क एका स्त्रीने हा प्रश्न
विचारला की बोधिसत्व म्हणजे
काय? ते कसे प्राप्त होते? . मग
तिथल्या धम्मचा-यानी बोधीसत्वा
बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
हाच प्रश्न इतराना पडत असल्यास
त्याचे उत्तर म्हणून बोधिसत्वाचा अर्थ
व प्राप्त होण्याचे टप्पे ईथे देत आहे.
बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या
व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे
अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे
पालन करताना बोधिसत्वाकडे
स्थित्यांतर सुरु होते.
१० पारमिता
१) शील:- शील म्हणजे नितिमत्ता,
पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे,
अपराध करण्याची लाज वाटणे.
२) दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार
अर्थात तन, मन धनानी दुस-याची
भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे अलिप्तता,
अनासक्ति, आवड-नावड नसणे,
फलप्राप्तिने विचलीत न होणे,
निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा
त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणे, हाती
घेतलेले काम माघार न घेता पूर्ण
सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात,
द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने
द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे,
कोणाचीही चुगली न करणे,
कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ
निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा
विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे
करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते
सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे
म्हणजे मैत्री होय.
वरील दहा पारिमितांचा सराव करता
करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते.
ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा
टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था.
एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की
मग जी अवस्था प्राप्त होते तीला
बुद्धत्व म्हणतात. तर दहा
पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व
प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते
पाहू या.
पायरी: १) मुदिता:- आनंदर प्राप्त
करुन घेतो, सर्व पाणिमात्रांच्या
कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व
विचार काढून टाकणे आणि दयाशील
बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व
अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज
होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते,
तो कशाचाही त्याग करण्यास तयार
होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे
तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग
मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान
व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या
बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष
व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध
असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा
बाळगणे.
पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप
होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त
होऊन परोपकार, सहनशीलता व
व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती,
शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण
अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले
आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी
जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती
अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत
उपासकास धर्म, शास्त्र, दिशा जगाचे
संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत
बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि
प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन
करता करता साधक बोधिसत्वाच्या
एक एक पाय-या चढायला सुरुवात
करतो. एक एक टप्पा पार करायला
कित्येक वर्षे जावी लागतात. दहा
पारिमिताचा पाया जेवढा भक्कत
तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या
ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर दहा
पारिमितांचे पालन करत करत
बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष
जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात
झाल्यावाचून राहिले नसते.
Wednesday, April 29, 2015
बोधिसत्व कसे प्राप्त होत
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
रामोशी समाजाची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी हे स्वताला रामवंशी समजत असत. म्हणून काही तज्ञ व्यक्ति रामोशी या शब्दाची फोड र...
No comments:
Post a Comment