सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तू माझी राधा.. मी तुझा कृष्ण
प्रेमाला काव्यात गुंफण्याचे
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसरतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
म्हणून माझे जीवापाड प्रेम व्यक्त
करायचे..राहूनच गेले.
Thursday, October 20, 2016
सांगायचे होते तुला काही...
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
'भारतीय स्त्री'ला शिक्षणाचे द्वार उघडे करुन देणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या एक उत्तम कवियत्री होत्या.महाराष्ट्रात स्त्रीशिक...
-
रामोशी समाजाची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी हे स्वताला रामवंशी समजत असत. म्हणून काही तज्ञ व्यक्ति रामोशी या शब्दाची फोड र...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment